मुख्य सामग्रीवर वगळा

वर्तुळ || कथा भाग १३ || पुढचा मार्ग ||



भाग १३

पुढचा मार्ग !!

सायली सोबत संबंध तोडल्या नंतर आकाश आता शांत झाला होता. कोणाशी जास्त बोलायचं नाही, कोणा मित्रात जास्त मिसळायचं नाही. जणू त्यानं स्वतःला स्वतःतच बंधिस्त करून घेतलं होतं. आत्ममग्न झालेला होता, जणू सुखही आपल्यात पाहत होता आणि दुःखही. या सगळ्या काळात त्याची एक सवय मात्र नेहमी त्याच्या सोबत होती. हस्तमैथून करण्याची. जणू आता त्याला त्यातच सुख सापडलं होत. मिळालेल्या मार्क्सना स्वीकारून त्याला पुढचा मार्ग पाहायचा होता. एक सकाळी बाबा त्याच्यासोबत परगावी आले, त्याच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घ्यायला. 
अकरावीला ज्या आकाशचा नंबर पहिल्या यादीत लागला होता. त्या आकाशला आता एडमिशन मिळावे म्हणून वणवण भटकाव लागत होत. 
"साहेब यापुढचा नंबर तुमचा आहे !!! प्रिन्सिपॉल साहेब आले आहेत !! "
कॉलेजमधला पिऊन म्हणाला. 
"बरं ठीक आहे !!"  बाबा स्वतःला सावरत म्हणाले. 
थोडा वेळ गेला पुन्हा प्रिन्सिपॉल साहेबांच्या ऑफिसची बेल वाजली. पिऊनने त्यांना आत जाण्याचा इशारा केला.
"आत येऊ सर ??"
समोर बसलेले प्रिन्सिपॉल त्यांना येण्याचा इशारा करतात. 
"बोला !! "
"माझ्या मुलाचं एडमिशन करायचं होत !!"
"यामध्ये मी आपली काय मदत करू शकतो ?? कारण कट ऑफ लिस्ट बाहेर लावली आहे!!"
"साहेब त्यात माझ्या मुलाचं नाव नाहीये !!"
"अच्छा !! बघू त्याचे मार्कशीट !!"
बाबा मार्कशीट देत म्हणाले. 
"त्याला थोडे कमी मार्क्स आहेत त्यामुळे जरा !!"
बाबा बोलता बोलता थांबले प्रिन्सिपॉल साहेबांनी बाबांकडे पाहिलं.
"पंचावन्न टक्के मार्क्स आहेत हे !! बीएससीला आमचे कमीत कमी सत्तर टक्के राहतात. मेडिकल कॉलेज मध्ये एडमिशन मिळालं नाही म्हणून इकडे येणारे आम्ही घेतच नाही !! कारण कोणतीच डिग्री कमी किंवा जास्त अशी आम्ही मानतच नाही !! "
"माहिती आहे मला सर पण खूप आशेने मी आलोय !! "
"सॉरी साहेब पण मी काही करू शकत नाही !!" प्रिन्सिपॉल साहेबांनी मार्क्सशीट बाबांकडे देत म्हणाले. 
बाबा क्षणभर शांत झाले पुन्हा त्यांनी आकाशला बाहेर जाण्यासाठी सांगितलं . आकाश बाहेर गेला. समोर अंधुक काच होती. त्यातून त्याला अस्पष्ट अस दिसत होत. बाबा जागेवर उभा राहिले. प्रिन्सिपॉल साहेबांकडे पाहत खाली वाकले. त्यांचे पाय पकडून बाबा बोलू लागले.
"साहेब !!कृपा करा पण माझ्या मुलाला तुमच्या कॉलेज मध्ये एडमिशन द्या !!"
प्रिन्सिपॉल साहेब जागेवरून उठले. मागे सरकले.
"आहों !! काय काय !! काय करताय काय तुम्ही !! उठा !! उठा !! समोर बसा बर तुम्ही!! "
बाबा समोरच्या खुर्चीवर बसले.
" हे अस नका करू साहेब , मलाही तुमचं दुःख कळतंय !! मीही एका मुलाचा बाप आहे !!"
"मग काय करू साहेब सांगा ना !! दहावीला वर्गात पहिला आलेला हा !! आज त्याची ही अवस्था पाहवत नाही !! तसा तो खुप हुषार आहे !! पण त्याला काय झालंय काही कळतं नाही !! "
"दहावीनंतर खूप पालकांची हीच तक्रार असते !! आपला पाल्य खूप हुशार आहे म्हणून ते लक्ष देत नाहीत !! आपणही शाळेतून बाहेर पडलो मुक्त झालो म्हणून हे पाल्य बेबंध वागतात !! आणि अगदी आयुष्याच्या वळणावर असलेल्या बारावीच्या परीक्षेत कमी मार्क्स मिळवतात !! "
"तरी मी त्याला काही कमी पडू दिलं नाहीये !! "
"हेच तर होत ना!! म्हणून तर त्यांना कशाची किंमत वाटतं नाही !! बरं ठीक आहे !! तुमच्याकडे पाहून मी त्याला एडमिशन देतोय !! पण त्याने अभ्यास नक्की केला पाहिजे!!"
"मी सांगतो ना !! तो नक्की करेन अभ्यास !! 
"ठीक आहे ,आता या तुम्ही !! "
प्रिन्सिपॉल साहेबांनी समोर ठेवलेल्या एडमिशन फॉर्मवर सही केली. आणि आकाशच एडमिशन झालं. आपल्या घरापासून दूर ,परगावी. 

बाबा बाहेर येताच आकाशने त्यांना विचारलं.
"काय म्हणाले !!"
"एडमिशन झालंय तुझं !!"
"वा !! ते तर होणारच होत!! दहावीचे मार्क्स काय कमी आहेत काय !!" आकाश क्षणात बोलून गेला. 
बाबा क्षणभर त्याच्याकडे पाहत राहिले. पण ते त्याला काहीच म्हणाले नाही.

दोघे त्या संध्याकाळी पुन्हा आपल्या गावी परतले. बाबांनी घडलेली सगळी गोष्ट आईला सांगितली. आकाश आपल्या खोलीत जाऊन तयारी करू लागला, तेवढ्यात त्याचा फोन वाजला,
"हा बोल दिप्या !!"
"भाई !! इंजिनियरिंग कॉलेज मध्ये एडमिशन झालं तुझ्या भावाच !!"
"वाह !! अभिनंदन !!"
"तुझ काय ?? "
"नगरला बीससीला एडमिशन कन्फर्म झालंय !! " 
"वाह !! तुझंही अभिनंदन !! "
"कसल अभिनंदन !! इथ थर्ड लागलाय सगळा !! जायचं होत एमबीबीएसला आणि आता करतोय काय तर !!जाऊ दे !! परवा निघतोय नगरला !!"
"परवा ?? लगेच !!"
"हो !! आता वैताग आलाय इथला !! "
"कळलय बर मला तुझ आणि सायलीच !! आधीच मला विचारलं असतस तर एवढा मुर्खात नसता निघालास !!"
"काय करावं आता !! आपलंच नशीब !! "
"नशीब बिशिप काही नाही चुत्या आहेस तू!! "
"खरंय भावा !! पण आता तिला विसरण खूप अवघड आहे मला !!"
"काय !! अरे दे विषय सोडून !! असल्या कितीही आल्या नी गेल्या !! "
"मनापासून प्रेम केलं होत रे !!"
"बरं बरं !! ते जाऊदे देवदास !! जायच्या आधी एकदा भेटायला या !! "
"नको रे !! मला खूप आवरा आवर करायची आहे !! "
"काय भाई !! हीच का तुझी दोस्ती !!"
आकाश पुढे काहीच बोलत नाही. फोन ठेवून देतो.

कोणाशीही काहीच जास्त न बोलता आकाश आवरू लागतो. त्याला कधी एकदा नगरला जाईल अस झालेलं होत. त्याच्या मनात कित्येक विचारांचं चक्र घोंगावत होत. 
" आयुष्याच्या मुख्य वळणावर मी माती खाल्ली !! नको त्या लोकांच्या संगतीत राहिलो आणि स्वतःची अवस्था बेक्कार करून ठेवली. याला जबाबदार कोण ?? तेच ज्यांनी मला धोका दिला ,मला पावला पावलांवर अडवल !! ती सायली , ते कॉलेजचे शिक्षक अजून खूप आहेत !! त्या सायली सोबत तर मी एक्झाम वेळी सुद्धा बोलत बसलो !! माझी परवा केली नाही पण तिची काळजी केली मी !! वाटोळं करून घेतलं मी !! पण आता बास झालं !! अशा लोकांना आता माझ्या आयुष्यात अजिबात जागा नाही !! मी आता इथून निघून जातोय !! निघून जातोय !! कोणी नाहीये माझं इथे !! "

आकाश दोन तीन दिवसांनी नगरला जायला निघाला. आईच्या डोळ्यातील अश्रू थांबता थांबत नव्हते. बाबा त्याला सोडायला येणार होते. 

"आई !! बस् आता !! पुढच्या महिन्यात येतोय मी !!"
"पहिल्यांदा घरापासून एवढं लांब राहणार आहेस !! काळजी घे पोरा !! "
"हो आई !! रडू नकोस आता !!"

बाबा आणि आकाश त्या संध्याकाळी नगरला पोहचले. बॉईज हॉस्टेलवर आकाशची राहायची सोय झाली होती. बाबांनी त्याची सगळी सोय व्यवस्थित आहे ते पाहून त्याला नीट राहण्याचा सल्ला दिला. अभ्यास कर !! म्हणून सांगितलं. आणि बाबा पुन्हा गावी परतले.

आकाश एकटाच बॉईज हॉस्टेलच्या खोलीत कित्येक वेळ पडून राहिला. समोर अजून दोन कॉट होते. त्यावर कोणाचं तरी सामान अस्ताव्यस्त पडलेल त्यानं पाहिलं. रात्री नवाच्या पुढे कोणीतरी जोरात खोलीचा दरवाजा उघडला, आकाश दचकला , समोर कोणीतरी आहे हे पाहून त्याच्याकडे पाहून हसला,

"ये !! हाय!! न्यू एडमिशन ??"
आकाशने होकारार्थी मान हलवली.
"मी सदानंद दाते !!  बीएसस्सी सेकंड ईअर !!"
"मी आकाश देशपांडे !! मूळचा मी बार्शीचा आहे !!"
"अरे वां !! मस्तच !! लई भारी गाव आहे बार्शी तर !!"
आकाश फक्त त्याच्याकडे पाहत राहिला.  सदानंदने खिशातील मोबाईल काढत फोन लावला,
"ये गंग्या !! भावा आपल्या खोलीत न्यू एडमिशन आलाय !! ये पटकन ये !!"

सदानंदने फोन ठेवला. आणि कित्येक वेळ आपल्या कामात व्यस्त राहिला. समोरून पुन्हा कोणीतरी आतमध्ये आले,

"न्यू एडमिशन ??"
आकाश फक्त त्यांना होकारार्थी मान हलवत असे. अश्यात रात्रीचे बारा वाजले. आकाश हॉस्टेलच्या मेसवर जेवण करून येतो. तिथेही त्याला सतत तोच प्रश्न विचारला जात असे. "न्यू एडमिशन ??" आकाश फक्त मान हलवत असे.

रात्रीच्या एक दीडच्या सुमारास आकाश आणि सदानंद झोपलेले असताना कोणतरी हळूच आकाशच्या जवळ येऊन त्याला उठवू लागलं.
आकाश दचकून जागा होतो. समोर कोणीतरी अनोळखी व्यक्ती पाहून घाबरतो. 
"आकाश ??"
"हो !!"
"न्यू एडमिशन ??" 
आकाश पुन्हा मान होकारार्थी हलवतो. 
"आता तुझं काही खर नाही!!" आणि तो जोरजोरात हसू लागतो.

"ये गंग्या उगाच नको भीती घालू रे पोराला !! मुतल ते चड्डीत !!" सदानंद खोलीची लाईट लावत म्हणाला. 
गंग्या जोरजोरात हसू लागला.

"अरे भावा !! नव्या दोस्त लोकांचं स्वागत तरी करू दे की मला !!"
" हे अस !! पोरगं मरल की!!"
"ये आपूनका स्टाईल आहे !! बरं भावा माझं नाव गणेश देशमुख !! सगळे दोस्त आपल्याला गंग्या म्हणतात !! "
आकाश डोक्यावरचा घाम पुसत त्याच्याकडे बघून हसतो. 

आकाशच्या आयुष्यात पुन्हा नवे वळण येते. त्याला आता आई बाबांपासून दूर राहावं लागतं होत. त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली होती. नवे मित्र , नवे शहर आणि नवे ध्येय त्याच्या सोबत होते.

क्रमशः


टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...